लिहावसं वाटतंय काहीतरी पण काय लिहू कळत नाही ,
सारखा तुझा विचार येतोय डोक्यात पण तू शब्दात उतरत नाही .
जेव्हा विचारांना शब्दांची जोड मिळते,
तुझी आठवण माझे डोळे अश्रूंनी भरवते.
तू म्हणतेस मला सोडून जाऊ नकोस मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही ,
पण तुला कसं सांगू गेल्याशिवाय मी तुझ्याकडे परत येणार नाही .
तुला सांगून थकलो लांब जाण हा नियतीचा नियम असतो ,
पण तू म्हणतेस हा नियम आपल्यात नको आणि मी तुला येऊन बिलगतो .
विरहाच्या भासानेच जीव वेडापिसा होतोय माझा ,
काय होईल त्या दिवशी तू नजरे आड जाताना ..
तुझा हात सुटताना कसा सावरू मी स्वताला ?
तुझ्याविना पाऊल टाकताना काय उत्तर देऊ एकत्र पाहिलेल्या स्वप्नांना ?
तुझ्यासाठी सगळा काही जिंकावस वाटतंय
मला परत येताना पाहून तुझ्या ओठांवर उमललेलं हसू बघत रहावसं वाटतंय..
सारखा तुझा विचार येतोय डोक्यात पण तू शब्दात उतरत नाही .
जेव्हा विचारांना शब्दांची जोड मिळते,
तुझी आठवण माझे डोळे अश्रूंनी भरवते.
तू म्हणतेस मला सोडून जाऊ नकोस मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही ,
पण तुला कसं सांगू गेल्याशिवाय मी तुझ्याकडे परत येणार नाही .
तुला सांगून थकलो लांब जाण हा नियतीचा नियम असतो ,
पण तू म्हणतेस हा नियम आपल्यात नको आणि मी तुला येऊन बिलगतो .
विरहाच्या भासानेच जीव वेडापिसा होतोय माझा ,
काय होईल त्या दिवशी तू नजरे आड जाताना ..
तुझा हात सुटताना कसा सावरू मी स्वताला ?
तुझ्याविना पाऊल टाकताना काय उत्तर देऊ एकत्र पाहिलेल्या स्वप्नांना ?
तुझ्यासाठी सगळा काही जिंकावस वाटतंय
मला परत येताना पाहून तुझ्या ओठांवर उमललेलं हसू बघत रहावसं वाटतंय..
लिहावसं वाटतंय काहीतरी !!!
Reviewed by Admin
on
06:23
Rating:

No comments: